वडगांवातील (जांबोटी) टीसी,खांब तात्काळ बदला ; गावकऱ्यांचे हेस्कॉमला निवेदन…

0

माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई यांच्या नेतृत्वाखाली तालुका हेस्कॉम अधिकारी बसवराज यांना निवेदन सादर……


IMG_20260806_150357

माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई यांच्या नेतृत्वाखाली तालुका हेस्कॉम अधिकारी बसवराज यांना निवेदन सादर…

खानापूर/वडगांव: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

     जांबोटी कार्यक्षेत्रात येणाऱ्या वडगांव (जांबोटी) येथील जुनाट टीसी तसेच गेल्या 40 वर्षापूर्वीचे विद्युत खांब बदलले नसल्याने नागरिक आणि जनावरांच्या जीवाला धोका तर निर्माण झालाच आहे, शिवाय टीसी- खांब खराब झाल्यामुळे शेती पाणी पुरवठ्यासाठी अपुरी वीज मिळत असून, वारंवार खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत, त्यासाठी तात्काळ येथील 25 kVA टीसी हटवून त्याठिकाणी 63 kVA बसवावा, तसेच 40 वर्षांहून अधिक जुने विद्युत खांब तात्काळ बदला या आशयाचे निवेदन माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज तालुका हेस्कॉम अधिकारी बसवराज यांना सादर करण्यात आले. यावेळी जांबोटी कृषी पत्तीनचे अध्यक्ष जयवंत देसाई, वडगांव प्राथमिक मराठी शाळेचे अध्यक्ष सागर दळवी आदी उपस्थित होते.


वडगांव (जांबोटी) गावकऱ्यांनी तालुका हेस्कॉम अधिकाऱ्यांना दिलेला अर्ज खालील प्रमाणे…


*विषय: ता. खानापूर, जि. बेळगाव येथील जांबोटी ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव गावातील 25 KVA ट्रान्सफॉर्मरऐवजी 63 KVA नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे आणि 40 वर्षे जुने वीज खांब बदलून देण्याबाबत विनंती.*

महोदय,

मी *श्री. सुनील शंकर देसाई, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष, जांबोटी*, ता. खानापूर, जि. बेळगाव आपणांस विनंतीपूर्वक कळवितो की,

आमच्या गावातील *वडगाव* येथे अनेक वर्षांपूर्वी बसवलेला *25 KVA* क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांत गावाची लोकसंख्या 580 वरून 600 पर्यंत वाढली आहे. तसेच शेती पंप, घरगुती वापर आणि इतर विद्युत उपकरणांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरवर सातत्याने भार वाढला असून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. कमी व्होल्टेजमुळे शेती पंप आणि घरातील उपकरणे चालत नाहीत, गावातील रस्त्यावरील दिवे मंद प्रकाश देत आहेत. कोणत्याही क्षणी ट्रान्सफॉर्मर जळून जाण्याचा धोका आहे.

त्याचप्रमाणे गावातील *वीज खांब सुमारे 40 वर्षे जुने* आहेत. ते पूर्णपणे जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहेत. वादळ, पावसाच्या वेळी तारा तुटून शॉर्ट सर्किट आणि अपघात होण्याची शक्यता आहे.

मी पूर्वी ग्रामपंचायत उपाध्यक्ष असताना आपल्या कार्यालयात दोन वेळा तक्रार दिली होती. ग्रामस्थही या समस्येबाबत माझ्याकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

त्यामुळे आपणांस नम्र विनंती आहे की,
1. *25 KVA ऐवजी 63 KVA क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर तात्काळ बसवावा.*
2. *40 वर्षे जुने, जीर्ण झालेले वीज खांब काढून त्याऐवजी नवीन RCC खांब बसवावेत.*

गावाच्या हिताच्या दृष्टीने तात्काळ पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी. या विषयात मी आणि ग्रामस्थ संपूर्ण सहकार्य देण्यास तयार आहोत.

कृपया तात्काळ लक्ष देऊन न्याय द्यावा ही विनंती.

आपला विश्वासू, 
*श्री. सुनील शंकर देसाई* 
माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष, जांबोटी 
ता: खानापूर, जि: बेळगाव 
संपर्क: 9481738331 
दिनांक: */*/2026


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed