माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी.         चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस  ..


माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी.         चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस  ..

खानापूर लोकहित न्यूज                           तालुका पंचहमी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी  व रूद्राप्पा पाटील यांनी अचानक चापगाव राशन दुकानास भेट दिली व तेथील  कामगाराकडे चौकशी केली असता आज रोजी शिवोली, वडेबैल व अल्लेहोळ या गावांचा राशन वाटण्यात आले असून, यामधे अंत्योदय कार्डाचे रेशन धारकाला किती कीलो तांदुळ वाटप केले याची चौकशी केली असता, ४ माणसांना ३५ किलो तांदूळ दिले अशी माहिती तेथील त्या कामगारांने दिली. त्यामुळे नियमाप्रमाणे ३५ ऐवजी ४५ किलो तांदूळ दिला पाहीजे, असे असताना दहा किलो तांदूळ दुकानदाराने कमी दिल्याचे निदर्शनास आले आहे. असा प्रकार कुठे आढळल्यास 8431081313 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन सूर्यकांत कुलकर्णी यांनी केले आहे.                  

नियमाचे पालन न केल्यास परवाना रद्द दुकानदाराने नियमाचे पालन करावे अन्यथा दोषी आढळल्यास संबंधित दुकानदारांचा परवाना रद्द करण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे. दहा किलो तांदूळ कमी मिळालेल्या वड्डेबैल, अल्लेहोळ, शिवोली गावकऱ्यांनी आपले तांदूळ घेऊन जावे असे कळविण्यात येत आहे. मार्च महिन्यांत बीपीएल कार्डधारकांना मानशी 15 किलो तांदूळ वाटप करणे दुकानदाराला बंधनकारक आहे. नसेल तर कारवाईला सामोरे जावे लागेल..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *