बेळगांव: लोकहित न्यूज
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्या बुधवार दिनांक 25 रोजी एक दिवसाची सुट्टी जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी जाहीर केली आहे. यापुढेही पावसाचे प्रमाण वाढतेच राहिल्यास तर सुट्टीच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी स्पष्ट केले. खानापूरसह जिल्ह्यातील बेळगांवसह बहुतेक तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी जनसंपर्क तुटण्याची भीती आहे. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून बुधवारची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.






Leave a Reply