ऑपरेशन सिंदूर मधून 9 ठिकाणीं हवाई हल्ले चढवत 75 दहशतवाद्यांचा खत्मा..
दिल्ली : लोकहित न्यूज
गेल्या महिन्यापासून तयारी केलेल्या भारतीय लष्कराने अखेर पाकिस्तानमध्ये घूसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत 75 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली. पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांचा बळी घेतलेल्या दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने मोठी तयारी केली असून, यापुढेही सर्जिकल स्ट्राईक सारख्या घटना घडण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी मध्यरात्री दहशवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने कारवाईची मोहिम उघडत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. आमच्या सैन्य दलावर भारताने हल्ला चढवल्याचा कांगावा पाकिस्तानकडून करण्यात येत असला तरी आम्हीं सैन्याच्या तळावर हल्ला केला नसून, दहशदवाध्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले असल्याचे प्रत्युत्तर भारताकडून देण्यात आले.
तब्बल तिस मिनिटांच्या वेळेत या ठिकाणीं झाली कारवाई…
काश्मीर, पाकव्याप्त आणि पंजाबकडील भागांतील बहावलपूर, मुजफरबाद, मुरीदके, कुपवाडा आदी ठिकाणीं हल्ले चढविण्यात आले आहेत. भारताने सुखोई, राफेल क्षेपणास्त्र सोडत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तर पापोर मध्ये पाकचे j – 7 हे फायटर जेट भारताने पाडले. पाकचा म्होरक्या हाफिज सईद याचेही तळ लक्ष्य करण्यात आले. भारताने संरक्षण चे सल्लागार अजित डोंबाल यांची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. ही कारवाई अधीकच कडक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply