21 मे च्या मुंबई आणि दिल्ली यांच्या सामन्यानंतर चौथा संघ ठरेल…
मुंबई: क्रीडा लोकहित न्यूज
यंदाचे आयपीएल पर्व संपत आले असून, शनिवारी पावसामुळे आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करुन दोन्हीं संघांना एक – एक गुण देण्यात आले. त्याचवेळी गेल्या वर्षी विजेता ठरलेल्या केकेआरचे आव्हान संपुष्टात आले. तर दुसरीकडे एक गुण मिळविलेल्या आरसीबी प्लेऑफ क्वालिफायचा मार्ग पक्का झाला होता. रवीवारी पंजाब किंग आणि आरआर यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात अखेर पंजाबने बाजी मारली तर दिल्ली आणि गुजरात यांच्यातील सामन्यात गुजरातने एकतर्फी विजय खेचून आणला. साईसुद्गर्शदन आणि कर्णधार शुभमन गील यांनी दोघांनीच विजयाचा कळस गाठला. यात साई सुदर्शनने शतक ठोकले तर गीलने 93 रणांची नाबाद खेळी केली. यामुळें रविवारी गुजरात आणि पंजाब तर शनिवारी बंगळूर हे तिन्हीं संघ प्ले ऑफ क्वालिफायसाठी पात्र ठरले असून, 21 मे ला होणाऱ्या दिल्ली आणि मुंबई यांच्यातील सामन्यानंतर चौथा संघ ठरेल…







Leave a Reply