तरच जिल्हा , तालुका पंचायत व ग्रामपंचायत निवडणुकांचा काँग्रेसच्या बाजूने मतदानाचा टक्का वाढेल…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
आपापल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराची SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, तसेच त्यांचे नाव मतदार यादीत कायम आहे का, याची तातडीने खात्री घेणे गरजेचे असून, आपल्या हक्काचा एकही मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहजे, एखाद्या मतदाराचे नाव वगळले गेल्यास त्याचा थेट फटका आपल्याला निवडणुकीत बसू शकतो, त्यामुळे झेडपी, टीपी व ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी हे काम तातडीने हाती घेऊन आपल्या-आपल्या वार्डात व मतदारसंघात प्रत्येक मतदाराच्या SIR प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन तालुका काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी सोसियल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. SIR ही बाब अत्यंत महत्त्वाची असून, त्यामध्ये कोणीही हायगय करू नये असेही त्यांनी पुढे बोलतांना नमूद केले आहे.