,

सरकार नागरिकांचे ऐकणार का?


तळेवाडीसह लगतच्या गावकऱ्यांची स्थलांतर नको सुविधा पुरवण्याची सरकारकडे  मागणी; नागरिकांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन…

खानापूर: विलास कवठंणकर (लोकहित न्यूज विशेष संपादकीय)

         भीमगड अभयारण्यात येणाऱ्या गावांचे पुनर्वसन करण्याची योजना सरकारने आखली आहे, पण त्या योजनेबाबत नागरिकांकडून वेगवेगळ्या शंका व्यक्त केली जात आहे. हे स्थलांतर आहे की, खानापूर तालुक्यातील मराठी टक्का कमी करण्याचा डाव आहे. खानापूरच्या लगत येणाऱ्या जोयडा तालुक्यात खानापूरहून अधिक जंगल भाग असून, त्याठिकाणी रस्त्यांसह सर्वच सुविधा पुरवण्यात आल्या आहेत, शिवाय तेथील वन्यप्राणी आणि वनखाते यांच्यात आजतागायत कोणताच संघर्ष पहायला मिळाला नाही. असे असताना खानापूरसाठी वेगळा वनकायदा का? अशा प्रश्न उपस्थित होत असताना दुसरीकडे शेकडो वर्षांचे रहिवाशी असणाऱ्या येथील नागरिकांनी आजपर्यंत जंगल अबाधित ठेवला असताना अलीकडेच हा प्रदेश भीमगड अभयारण्य म्हणून जाहीर झाल्यामुळे प्राण्यांच्या सुरक्षेसाठी नागरीकांचे स्थलांतर करण्याची योजना सरकारने आखली आहे. मात्र, नागरिकांचा स्थलांतराचा विरोध असून, जोयडा तालुक्याप्रमाणे आम्हालाही सुविधा द्या स्थलांतर नको अश्या मागणीचे निवेदन तळेवाडीसह लगतच्या गावकऱ्यांची वनमंत्री ईश्वर खांड्रे यांना पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हाधिकारी महमद रोशन यांच्या उपस्थितीत सादर केले. पण , सरकार नागरीकांचे ऐकणार का? की, आपलेच खरे करणार असा प्रश्न आहे.

  तळेवाडीच्या नागरिकांना दहालाखाचा धनादेश वाटप …

      वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्याहस्ते, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हाधिकारी महमद रोशन, जिल्हा मुख्य वनाधिकारी चव्हाण, जिल्हा सहायक वनाधिकारी राजा ख्रीस्तो, जिल्हा पोलिप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या उपस्थितीत नागरिकांना दहा लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले. मात्र, त्याचवेळी काहीं नागरिकांनी आमचे स्थलांतर नको सुविधा द्या अशी मागणी करत वनमंत्र्यांना निवेदन सादर केले. यावेळी कोंगळा गावच्या नागरिकांनीही मंत्र्यांना नागरी समस्या सोडवण्यासबाबत निवेदन दिले. यावेळी बोलतांना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी किमान पंधरा लाख रुपये धनादेश देण्याची गरज असल्याचे सांगितले.

भांडूरा प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका; पर्यावरणप्रेमींचे वनमंत्र्यांना निवेदन सादर…

    जंगलाची नुकसान करत खानापूर तालुक्यातील भांडूरा नदीचे पाणी धारवाड भागांत नेण्याची योजना सरकारने आखली आहे, परिणामी या प्रकल्पामुळे जंगलाची हानी होणार असून, वन्यप्राण्यांचे अस्तित्व नष्ट होईल, शिवाय यं भागांत पावसाचे प्रमाण कमी होवून पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होईल. अशा अनेक समस्या निर्माण होणार असल्याने भांडूरा प्रकल्पाला परवानगी देवू नये या आशयाचे निवेदन पर्यावरप्रेमींनी वनमंत्री ईश्वर खंडरे यांना सादर केले. यावेळी कॅप्टन नितिन धोंड, सुजित मुळगुंद व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

त्यावेळीं एसीएफ सुनीता निंबरगी, आरफओ श्रीकांत पाटील, आरएफओ तेज वाय व त्यांचे सहकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *