तब्बल 18 वर्षानंतर आरसीबीने आयपीएल ट्रॉपीवर कोरले नाव….


मंगळवारी अहमदाबाद मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पंजाबचा 6 धावांनी पराभव; शशांक सिंग एकेरी झुंज व्यर्थ.. मुंबईतून बंगळूरमध्ये दाखल झालेल्या कुणाल पांड्याचा मुंबई इंडियन्समधून खेळलेला अनुभव बंगळूर च्या कामी आला…

अहमदाबाद : लोकहित न्यूज

जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल क्रिकेटचे आज ( मंगळवार -3) शेवटचे द्वंद आरसीबी आणि  पंजाब किंग यांच्यात रंगले होते. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने विराट कोहली ( 43 धावा) च्या जोरावर 191 धावांचे योगदान पंजाब समोर ठेवले होते. सुरवातीला पंजाबच्या सलामवीरांनी चांगली सुरवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण, काहीं कालांतराने मुख्य विकेट गेल्याने बंगळूरची बाजू मजबूत होत गेली. त्यात श्रेयस अय्यर, मार्कस स्टोईनीस च्या विकेट ने सामना पलटला. तरीही शशांक सिंग ने नाबाद 61 धावांची अखेपर्यंत एकेरी झुंज दिली. परंतु कमी चेंडू धावा अधिक त्यात विकेट गेल्याने अखेर अवघ्या 6 धावांनी  बंगळूर संघ यंदाचा आयपीएल वेजेता ठरला.. यात महत्वाचे म्हणजे मुंबई इंडियन्स मधून बंगळूरमध्ये यंदा दाखल झालेल्या कुणाल पांड्याचा मुंबईच्या पाच विजयांचा अनुभव बंगळूरच्या कामी आला असेच म्हणावे लागेल..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *