अमेरिकेच्या मध्यस्तीने युद्ध थांबले;; सोमवारी होणार दोन्हीं देशांमध्ये चर्चा.. आज आयपीएल बाबत बीसीसीआयची बैठक..
नवीदिल्ली: लोकहित न्यूज
पहलगाम येथे निष्पाप भारतीय पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या पाकला भारताने चांगलाच दणका दिला आहे. साधारणतः आठवडाभर चाललेल्या या युद्धात पाकिस्तानच्या महत्वाचे अड्डे व तळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त करत शेकडो आतंकवाद्यांना यमसदनी धाडले आहे, अखेर भयभीत झालेल्या पाकने अमेरिकेकडे मदत मागितली अन् लागलीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकला चांगलेच फैलावर घेतले. तुम्हीं भरताच्या नादी लागू नका अशी तंबी देत भारताकडे युद्ध थांबवण्याची मागणी केली. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकला कोणत्याही अटी न ठरवता युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, पण, सोमवारी होणाऱ्या दोन्हीं देशांच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानला धडा शिकविल्याबद्दल केंद्रातील संरक्षण खात्याचे कौतुकच!
…पण, ज्या रागाने भारताने पाकिस्तानवर हल्ला चढविला त्या पहलगाममध्ये निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोरांचा अद्याप शोध लागू शकला नाही. याबाबत कुठपर्यंत आला तपास असा प्रश्न संपूर्ण भारतीयांना पडला आहे. या हल्लेखोरांना प्रथमतः शिक्षा झाली पाहिजे तरच मृत भारतीय पर्यटकांच्या आत्म्याला शांती मिळेल..
युद्धामुळे अनेक गोष्टींवर परिणाम… राज्यांतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मुडवर , आयपीएलबाबत आज निर्णय…
दरम्यान आठवडाभरच युद्ध चालले पण, देशातील अनेक गोष्टींवर परिणाम जाणवला आहे. देशांतील सर्व राज्यांतील सुरक्षा यांत्रना अलर्ट मुड वर आहे.त्यात पाकसह इतर देशांच्या भारतीय सीमेवरील यंत्रणा तर अधिकच सतर्क झाली आहे. कर्नाटकातील पोलिस, लष्करातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्याची सूचना गृहमंत्री डॉ.जी. पी परमेश्वर यांनी केली आहे. यामुळे क्रिडा क्षेत्रातही अनेक बदल करावे लागले आहेत. जगातील मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल सामने थांबवण्यात आले असून, आज रविवार दि.11 याबाबत बैठक बोलावण्यात आली असून, यावेळी ठोस चर्चा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply