पहलगाम हल्याला एक महिना उलटला तरीही अद्याप आरोपी सापडू शकले नाहीत?


केंद्रीय संरक्षण खात्याकडून आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध करूनही विलंब का?; एनआयए व सुरक्षा दलासमोर आव्हान, खानापुरात तिरंगा ध्वज यात्रा…

  नवीदिल्ली/ खानापूर : लोकहित न्यूज ( वृत्तसंस्था)

         हसत्या खेळत्या नंदनवनात अनोख्या निसर्गाचा आनंद घेणाऱ्या 25 पुरुष पर्यटकांवर दहशदवाद्यांनी जाणीवपूर्वक हल्ला चढवत निष्पाप बळी घेतले होते. त्यामुळें देशात एकच संतापाची लाट उसळली होती. लागलीच या घटनेच्या 24 तासात संरक्षण खात्याच्या एनआयए  व सुरक्षा दलाकडून हल्लेखोरांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर महिना उलटला तरी अद्याप हल्लेखोरांचा सुगावा लागू शकला नाही.  भारतीय लष्कराने ‘सिंदूर ‘ ऑपरेशन कारवाई हाती घेत काहीं संशयीतांचा खात्मा करत दहशदवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र, त्यातील पहलगाममध्ये दहशत मजवणाऱ्या खऱ्या आरोपींची माहिती  अद्याप उघड होवू शकली नाही. हा तपास लागणार कधी? आणि आरोपींना शिक्षा होवून निष्पाप बळी गेलेल्या पर्यटकांना न्याय कधी मिळणार ? असा प्रश्न संपूर्ण भारतीयांना पडला आहे.

      दहशतवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या मध्ये  25 जण भारतीय तर एक विदेशी पर्यटक पर्यकाचा समावेश होता अशा एकूण 26 जणांचा बळी गेला असताना महिना उलटला तरी एनआयएकडून अद्याप तपास सुरूच आहे. तपास यंत्रणेने जारी केलेल्या पाच आरोपींपैकी तीन पाकिस्तानात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र , त्याला आतापर्यंत 30 दिवसांचा कालावधी संपत आला तरी अद्याप कोणताच तपास लागू शकला नाही. ते आरोपी आहेत कुठे? कोठून आले होते. गेले कशे? त्यावेळीं तपास यंत्रणा काय करत होती, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

……दीडशे स्थानिकांची तपास यंत्रणेनेकडून चौकशी…

           आतापर्यंत दिडशे स्थानीक नागरिकांची धरपकड करुन चौकशी करण्यात आली. शिवाय तपास यंत्रणेने जारी केलेल्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपये सरकारी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. हल्यावेळी येथील एक दुकान हल्याच्या दिवशी बंद होते. ते अद्याप खोलू शकले नाही. शिवाय हल्ला झाला त्यादिवशी बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी व बाजूच्या पर्यटकांनी सदर घटनेचे व्हिडिओ केले होते. त्याआधारे तपासाला गती येईल असे वाटत असले तरी तपास यंत्रणा कोणत्या दिशेने तपास करते त्यावर सर्व अवलंबून असेल असे मत जाणकारातून व्यक्त केले जात आहे.

….सैनिकांच्या सिंदुर कारवाईबद्दल भाजपच्या नेतृत्वाखाली तिरंगा ध्वज यात्रा…

     भाजपच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी भारतीय सेनेच्या ‘सिंदूर’ कारवाईचा गौरव म्हणून देशभर तिरंगा ध्वज विजयी यात्रा काढण्यात येत आहेत. हे जरी कौतुकास्पद असले तरी दहशदी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या मारेकऱ्यांचा तपासही लवकरात लवकर लगावा म्हणून सर्वांनी मागणी करणे गरजेचे आहे. खऱ्या मारेकऱ्यांना शिक्षा झाल्यानंतरच हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्यास शांती मिळेल शिवाय त्या दिवशी खऱ्या अर्थाने तपास यंत्रणेचे यश यशस्वी झाले असे, म्हणावे लागेल..

….खानापुरात खा. हेगडेंच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आली तिरंगा ध्वज यात्रा…

   ‘सिंदूर ‘ ऑपरेशनमुळे शेकडो दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. भारतीय सेनेच्या अभिमानस्पद खासदार विश्वेश्वर -कागेरी हेगडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापुरात शुक्रवारी तिरंगा ध्वज विजयी यात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रार्थना करु या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला मोकळीक दिल्यानेच ही कारवाई यशस्वी झाली असे म्हणावे लागेल असे सांगितले. आ . विठ्ठल हलगेकर यांनी भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या ऑपरेशन ‘सिंदूर’ बद्दल कौतुक केले. यावेळी भारत माता की जय च्या घोषणेने येथील परिसर दणाणून गेला होता. यावेळी खा. हेगडे, आ. हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, अध्यक्ष बसवराज सानीकोप , सचिव मल्लापा मारीहाळ, भाजप नेते सुरेश देसाई, युवा नेते पंडित ओगले, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, गुंडू तोपिनकट्टी, ॲड. चेतन मनेरीकर यांच्यासाह अंगणवाडी शिक्षिका, सरकारी कर्मचारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *