उन्हाचा चटका; गरमीचा पारा चढता


नदी- नाले कोरडे; तालुक्यात अनेक गावांत पाणी टंचाई

   खानापूर: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी)

         गेल्या महिन्यापासून बेळगांव, खानापूर तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला असून, सर्वत्र लाही लाही लाही होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा उन्हाचा पारा चढता असल्याने गरमीने उच्चांकी गाठली आहे. खानापूर व बेळगांव शहर परीसरात उन्हाचा तडाखा अधिक असून, ग्रामीण भागांतील जंगल प्रदेशात गरमीचे प्रमाण कमी आहे. जांबोटी भागांत गरमीचे प्रमाण कमी असले तरी काहीं गावात पाणी समस्या जाणवू लागली आहे.

नदी नाले कोरडे पडू लागले .. अनेक गावात पाणी समस्या…

मलप्रभा नदीतील पाणी पातळी कमी होत चालली असून, भविष्यात पिकांसह नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावामध्ये पाणी समस्या भेडसावण्याची भीती आहे. खानापूर तालुक्यात काहीं गावात तर जांबोटी भागात जांबोटीसह ओलमणी, हब्बनहट्टीसह भागांतील काहीं गावात पाणी समस्या निर्माण झाली आहे. याचा पाठपुरावा स्थानीक ग्राम पंचायतीने करण्याची गरज नाही.

उन्हाचा चटका; थंड पेयांना ‘अच्छे दिन ‘

    उन्हाच्या चटक्याने अंगाची काहीली होत असल्याने नागरिकांना थंडाईची गरज भासत आहे. त्यामुळे शिपेयांच्या ठिकाणीं गर्दी होत आहे. नारळाचे पाणी, सोलकडी, कलिंगड, मोसंबी, सफरचंद पेयांना अधिक पसंती दिली जात आहे. बेळगांव आणि खानापूर शहराच्या ठिकठिकाणी शीतपेयांची दुकाने थाटण्यात आली असून, त्याठिकाणी नागरीक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे थंड पेयांना  ‘अच्छे दिन ‘ आले आहेत..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *