सरकारकडून आशा कार्यकर्त्यांची दिशाभूल का?


मुख्यमंत्र्यांकडून दहा हजारची घोषणा; मात्र, प्रत्यक्षात बजेटमध्ये एक हजारची तरतूद, चन्नम्मा सर्कलमध्ये आशा कार्यकर्त्यांचे आंदोलन..

बेळगांव: लोकहित न्यूज

  दोन महिन्यांपूर्वी बंगळूरला वाढीव पगारासाठी आशा कार्यकर्त्यांनी आठवडाभर मोर्चे, धरणे आंदोलने केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आशा कार्यकर्त्यांना भेटीचे निमंत्रण देवून बैठक मागणी मान्य करत गेल्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्याची हमी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात एक हजारची तरतूद करण्यात आली आहे. तरीही काहीं दिवस प्रतीक्षा केलेल्या आशा कार्यकर्त्यांनी आज चन्नम्मा सर्कलमध्ये रास्ता रोको आंदोलन केले होते.

त्यामध्ये सरकारने सांगितले एक आणि केले दुसरेच असे आमच्या बाबतीत घडले असून, सरकारने आमची दिशाभूल केल्याचा आरोप करत, तत्काळ आम्हाला वाढीव दहा हजारपर्यंत मानधन न दिल्यास यापुढे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या मोर्चा दरम्यान देण्यात आला आहे.

काय आहे अशांची मागणी?

आशा कार्यकर्त्या या सामाजिक बालकल्याण खात्यामध्ये येतात. या खात्यांतर्गत त्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांना कामाप्रमाने मानधन मिळत नाही. गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यापासून ते बाळंतपणापर्यंत त्यांनी काळजी घेतली जाते. त्यासाठी त्यांना गावोगावी फिरावे लागते. त्यासाठी लागणारा खर्च सद्याच्या महागाईत परवडणारा नाही. याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे. अनेकवेळा आंदोलने, मोर्चा, मागणी करूनही सरकार लक्ष देत नाही. आमच्या वेदना कोण समजून घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे…

प्रतिक्रिया

सरकारने आम्हाला दहा हजारपर्यंत मानधन देण्याची हमी दिली होती. खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आमच्याशी बैठक घेऊन असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात पाहतो तर काय बजेटमध्ये फक्तच 1 हजारची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने शब्द पाळला नाही… आमची मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन असेच सूरू राहील..

-लक्ष्मी गौडर, आशा कार्यकर्ती बेळगांव..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *