मार्चच्या रेशन कोट्यात  15 किलो तांदूळ द्या


पंचहमी योजना अध्यक्ष -सदस्यांची दुकानदारांना सूचना..

खानापूर: लोकहित न्यूज

फेब्रुवारी महिन्यातील 5 किलो तर चालू मार्च महिन्यातील 10 किलो असे मिळून 15 किलो तांदूळ या महिन्यात वाटप करा अशी सूचना सरकारकडून आली असून, तीचे सर्व दुकानदारांकडून पालन झाले पाहिजे असेही फर्मान काढण्यात आले आहे.

   तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी व त्यांचा समिती सदस्यांकडून तालुक्यात दुकानदारांना सूचना करण्यात येत आहे.  हमी योजनेचे सदस्य व सामाजिक व संजय गावडे यांनी जांबोटी भागातील रेशन दुकानदारांची भेट घेऊन त्यांना या महिन्यात 15 किलो तांदूळ वाटप करण्याची सुचना केली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *