तालुक्यात एकच खळबळ;; घरगुती कोणते कारण नसून पंचायतीतून दबाव का? पोलिस तपासानंतर होणार स्पष्ट..
खानापूर: लोकहित न्यूज
2007 पासून निट्टुर ( ता. खानापूर) ग्राम पंचायतीत ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या संजय कोळी यांनी पंचायतीत अद्याप कायमस्वरूपी काम न झाल्याच्या तणावातून आत्महत्या केली का? असा प्रश्न निर्माण होत आहे. घरच्यांच्या माहितीनुसार संजय यांना घरचा कोणता तणाव नव्हता तर पंचायत कामातून की, इतकी वर्षे काम करूनही शासनाने कमावर कायमस्वरूपी न केल्याच्या तणावातून जीवनाला कवटाळले असावे असा अंदाज आहे,अशी माहिती तालुका काँग्रेसचे नेते महादेव कोळी यांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली. याबाबत पोलिसात एफआयएर दाखल करण्यात आले असून, त्यात घरगुती कोणता तणाव नव्हता तर कामावर कायमस्वरूपी न केल्याने किंवा ग्राम पंचायत कामाच्या व्यापातून आत्महत्या केली असावी असे नमूद केल्याचेही कोळी यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले. त्यामुळे तालुक्यांत एकच खळबळ माजली असून, पोलिस तपासानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे.
कायमच तणावाखाली राहणाऱ्या संजय कोळी (वय 45 )यांनी आपल्या मुळ गावी नागुर्डा ( ता. खानापूर) येथील शेतातील घराच्या दुसऱ्या खोलीत गळफास लावून घेवून जीवन संपविले. ते सकाळीं सातच्या सुमारास गुरांना वैरण टाकण्यासाठी शेताकडे गेले होते. त्यांनी गुरांना वैरण टाकलेही मात्र, त्यानंतर काहीं वेळातच नऊच्या सुमारास आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा -मुलगी असा परिवार आहे.
शासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका अशा कर्मचाऱ्यांना बसतोय का?
आजच्या घडीला पंचायतीत क्लार्क, ऑपरेटर, वॉटरमन, सचिवसह इतरही खात्यांतील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून घेण्यास शासन विलंब करत असल्याने अशा घटना वाढत आहेत असे अधोरिक होत आहे. अनेक वर्षे कमी पगारात काम करुन तेही कोणत्याच शासकिय योजना न मिळता आजच्या महागाईत घरचा गाडा कसा हाकणार असा प्रश्न अशा कर्मचाऱ्यांच्या मनात कायम सतावत असतो. त्यामुळे शासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका अशा कर्मचाऱ्यांना बसतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे शासनाने याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.
Leave a Reply