जमिनीची पीटी सीट काढून देण्यासाठी 4500 लाच घेतांना लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात, सहा महिन्यापूर्वी दोनदा कारवाई होवूनही सुरूच होता भ्रष्टाचार…
खानापूर: लोकहित न्यूज
सहा महिन्यापूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड, सर्वे कार्यालयात धाड टाकून तिघांना निलंबित करण्यात आले होते. या धडक कारवाईने बेळगांवसह राज्यातील अधिकाऱ्यांत एकच खळबळ माजली होती. असे असतानाही काहीं दिवसानंतर ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ च सुरू होते. काहीं दिवसापूर्वी सदाशिव कांबळे यांनी आपल्या जमिनीची पीटी शीट काढून देण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली होती. त्याचे सर्वे करण्याचे काम विनोद संबानी यांच्याकडे होते. या कामासाठी सर्वेअर विनोद यांनी सदाशिव कांबळे यांच्याकडे 4 हजार 500 रुपयांची मागणी केली होती. या काळात कांबळे यांनी अनेकवेळा विनवणी करूनही सर्वेअर पैशाशिवाय काम करणार नसल्याचा हेका लावून धरला होता. त्यामुळें सदाशिव कांबळे यांनी काहीं दिवसापूर्वी लोकायुक्त पोलिसात तक्रार केली होती. त्यानुसार लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार सदाशिव कांबळे यांनी सर्वेअर विनोद यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पारिश्र्वाड येथील आपल्या घराकडे पैसे आणून द्या अशी सूचना केली होती. त्यानुसार सदाशिव कांबळे यांना सर्वेअरच्या सांगितलेल्या पत्त्यावर पाठवून सापळा रचण्यात आला. त्यानुसार पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी आरोपींची चौकशी सुरू असून, आणखी काहीं धागेदोरे लोकायुक्त पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती लोकायुक्त पोलिस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी लोकहित न्यूज’ शी बोलताना दिली. ही कारवाई जिल्हा लोकायुक्त पोलिस प्रमुख हणमंतराय यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक संगमेश होस्मनी, अन्नपूर्णा यांनी ही कारवाई केली.
पुन्हा तहसीलमध्ये गोंधळ सुरू असल्याची होती चर्चा… नागरिकांची अशीच दक्षता राखणे गरजेचे…
तालुक्यात सरकारी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव नसल्याने पुन्हा सर्वेसह तहसील कार्यालयात गोंधळ सुरू असल्याची चर्चा नागरिकात सूरू होती. अलीकडच्या काळात तालुक्यांतील नागरीक सज्ञान झाले असून, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यास पुढे येऊ लागले आहेत, ही कौतुकाची बाब आहे. नाहीं तर नेते आपली पोळी भाजून घेण्यासाठी कोणताच दबाव टाकत नाहीत. त्यासाठी नागरिकांनी अशीच दक्षता राखणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत…
Leave a Reply