राज्यात भाजप युतीचे सरकार, लातूर जिह्यात भाजपचे तीन आमदार.. तरीही लातूर जि.परिषदेसमोरील पुतळा झाकलेलाच..
लातूर : लोकहित न्यूज..
महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंची ओळख आहे. पक्ष बळकटीसाठी त्यांचें मोठें योगदान लाभले आहे, मुंडे हे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हें तर देशपातळीवरील भाजप नेते आहेत. त्यांचें आकस्मित निधन झाले. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या लातूर जिह्यात भाजप पक्ष बळकट करण्यात मुंडे यांनी मोठें परिश्रम घेतले आहेत. लातूर जिल्हा परिषदेसमोर वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या मुंडेंच्या पुतळ्याच्या अनावरणास स्थानीक आणि राज्याच्या नेत्यांना वेळ मिळेना? त्यामूळे नागरिकांतून…का रे इतका दुरावा… अशा भावना व्यक्त होत आहे. . राज्यात भाजप युतीचे सरकार असून, मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे याही मंत्रिमंडळात आहेत. त्याचंही याकडे लक्ष नसून, लातूर जिह्यात भाजपचे तीन आमदार असताना त्यांनाही या कामाकडे लक्ष द्यायला वेळ मिळेना!
महान नेत्याबाबतही असेच.. मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते उद्घघाटन करणार … या नादात दिड वर्ष लोटले…
पुतळ्याचे भूमिपूजन दिमाखात झाले, मात्र, पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते अनावरण करणार, या नादात तब्बल दीड वर्ष लोटले…तरीही मुहूर्त सापडेना.. गोपिनाथ मुंडे यांची 3 जूनला पुण्यतिथी आहे, त्याआधी तरी अनवरणाचा कार्यक्रम पार पडेल का? असा प्रश्न आहे…भाजपच्या राष्ट्रीय ज्येष्ठ नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडे हे नाव कायम अग्रस्थानी घेतले जाते. अशा नेत्याचा पुतळा त्यांच्याच कार्यक्षेत्रात उभारला जातो , आणि त्याच्या अनावरणास दिड वर्षाचा कालावधी उलटला तरी मुहूर्त सपडत नाही, यासारखे कोणते दुर्दैव असेल का? असा प्रश्न आहे. म्हणजे काय तर नोट चलनात असेल तरच तीला महत्व , नाहीं तर नाहीच ! तर दुसरीकडे मुंडे यांचे मिञ विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारून माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवारांच्या हस्ते अनावरणही झाले..

Leave a Reply