मुस्लिमांना जाहीर केलेले 4% टक्के आरक्षण रद्द करा


खानापूर भाजपची मागणी; खानापूरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री, डी. के. शिवकुमार यांच्या प्रतिमेचे दहन

खानापूर: लोकहित न्यूज

राज्य काँग्रेस सरकारने हिंदू, दलितांवर अन्याय करत मुस्लिमांना झुकते माप दिले आहे. मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देत आपलीं व्होट बँक मोठी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे हिंदू, दलितांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत केले आहे. या सरकारला शेतकऱ्यांचाही विसर पडला असून, मुस्लिम सोडुन सर्व समजांवर या सरकारने अन्याय केला आहे. मुस्लिमांना जाहीर केलेले 4 टक्के आरक्षण तत्काळ रद्द करावे अन्यथा अशी आंदोलने कायमच सूरू राहतील असा इशारा तालुका भाजपने सरकारला देण्यात आला आहे.

यावेळी खानापूर येथील राजा शिव छत्रपती स्मारकासमोर तालुका भाजपतर्फे आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या,उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानीकोप, माजी आमदार अरविंद पाटील, माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, युवा नेते पंडित ओगले, सचिव मलाप्पा मारीहाळ, सुरेश देसाई, सुंदर कुलकर्णी, सदानंद वसुलकर, राजू करंबळकर, प्रकाश नीलजकर, रवि बदिगेर, यशवंत गावडे, मोहन पाटील, राहुल आळवणी, ॲड. चेतन मनेरीकर, किशोर हेब्बाळकर, सयाजी पाटील, प्रशांत लक्केबैलकर , अभिजित बाळेकुंद्री, प्रदीप पवार, विठ्ठल निडगलकर आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *