नव्याने होवू घातलेला ह्याथरी (hetchery ) प्रोजेक्ट तत्काळ थांबवा; गावकऱ्यांचे बैलूर ग्रा. पंचायतीला निवेदन, एनओशी देवू नये अशी जोरदार मागणी..
बैलूर : लोकहित न्यूज
गेल्या दहा वर्षापासून गावकऱ्यांचा तीव्र विरोध असताना क्वालिटी कंपनीचा नियमबाह्य,बेकायदेशीर पोल्ट्रीफार्म आतापर्यंत सूरू होता तर गेल्या वर्षापासून याच कंपनीने हॅथरी नावाने पुन्हा मोठा पोल्ट्री फार्म थाटण्याचा घाट घातला आहे. परिणामी इतकी वर्षे येथील नागरिकांचा जीव धोक्यात आलेला असताना आता पुन्हा नव्याने मोठा प्रोजेक्ट उभारण्याची तयारी चालविली आहे, त्याला लागणारी ग्राम पंचायत एनओशी देवू नये या आशयाचे निवेदन कौलापूरवाडा ग्रामस्थांनी ग्रा. पं. सदस्या सखुबाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलूर ग्रा. पंचायत अध्यक्षा आरोही सावंत व पीडीओ सुनील अंबारे यांना सादर करण्यात आले.
त्यात, आधीच्या पोल्ट्री फार्ममुळे गावात माश्यांची फैदास वाढल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असून, आता पुन्हा पंचायतीची परवानगी अर्थात एनओशी नाहीं, प्रदूषण मंडळाने परवानगी नाकारली असतानाही ह्याथ्री नावाने पुन्हा एक मोठा प्रॉजेक्ट उभारण्याचा घाट घातला आहे. त्याचा आमचा पूर्णपणे विरोध आहे, परिणामी आमच्या जीवनमरणाचा प्रश्न असून, आम्हीं जगावे की नको हे शासनाने सांगावे. कोणतीही परवानगी नसताना , आमचा गावकऱ्यांचा तीव्र विरोध असताना हा प्रोजेक्ट कसा उभा राहू शकतो. या क्वालिटी कंपनीला कोणाचा आशीर्वाद आहे असा संतप्त सवाल यामध्ये नागरिकांनी उपस्थित केला आहे. ग्राम पंचायतीने याची गंभीर दखल घेऊन हा प्रोजेक्ट होवू देवू नये अशी मागणी करण्यात आली आहे. उपाध्यक्षा सुतार, माजी अध्यक्ष रामलिंग मोरे, ग्रा. पं. सदस्य विठ्ठल नाकाडी, कांचन बिर्जे, लक्ष्मण बण्णार, परशुराम नाईक, सदस्या कांबळे, पंचायत अधिकारी पुंडलिक हेब्बाळकर, सामाजिक कार्यकर्ते भौरू पाटील, चीचू बी. येडगे, रामू ची. येडगे , धुळू जंगले, गंगाराम भा. येडगे, नवलू सा. खरवत, बाबू धा. पाटील, बाबू बावदाने, अप्पू मा. शिंदे, दीपक का. गावडे आदी उपस्थित होते. सदर निवेदन स्वीकारून याची दखल घेण्यात येईल, सदर प्रोजेक्टवर आमची नजर असेल अशी हमी पीडीओ अंबारे यांनी नागरिकांना दिली.
जेवणाच्या ताटावरच माशांचा हल्ला; पोटाला खावे की, उपाशी रहावे.. याचे उत्तर शासनाने द्यावे…
लगतच्या गावापासून 500 मीटर अंतर दुर पोल्ट्री फार्मला परवानगी दिली जाते. मात्र, कौलापूरवाडा येथील क्वालिटीचा पोल्ट्री फार्म अवघ्या शंभर मीटर अंतरावर थाटण्यात आला असून, गेल्या दहा वर्षांपासून यातून पैदास वाढलेज्या विषारी माश्यामुळे पोटाला खाणे मुश्किल होऊन बसले आहे. थेट जेवणाच्या ताटावरच माश्यांचा हल्ला पडत असल्याने पोटाला खावे की उपाशी रहावे याचे उत्तर शासनाने द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
प्रतिक्रिया..
नागरिकांचा जीव महत्वाचा की, सावकारी पोट्रीफार्म मोलाचा हे शासनाने ठरवावे. आमच्या जीवात जीव असेपर्यंत आमचा लढा आणि विरोध कायम असेल हे शासनाने लक्षात ठेवावे..
- सखुबाई पाटील, ग्राम सदस्या कौलापूरवाडा..
Leave a Reply