जांबोटीवर विठ्ठलांची कृपादृष्टी; आज या गावच्या रस्त्यांचा भाग्याचा दिवस..


चीगुळे,पारवाड रस्त्यांचा विकासाबाबत सोसियल मीडियावर चर्चा; याही रस्त्यांची समस्या सोडवण्याची गरज…

जांबोटी:: लोकहित न्यूज

  तालुक्याचे सर्वच नेते आपल्या भाषणात प्रत्येक गावच्या स्टेजवर जांबोटी पश्र्चिम भाग मागासलेला असा उल्लेख वारंवार करत असतात, पण का? मागासलेला याचे उत्तर त्यांच्यापैकी कोणाला अद्याप तरी सापडले नाही हे नवलच म्हणायचे की, या भागांतील नागरिकांचे दुर्दैव हेच कळेनासे होते आहे. खराब रस्त्यांचा विकास हीच या भागांतील सर्वात मोठी समस्या म्हणावी लागेल.. येथील रस्त्यांच्या आडवाटेत कायद्याचा बडगा उगारणाऱ्या वनखात्याला अद्याप तरी कोणालाच आवर घालता आलेला नाहीं तर दुसरीकडे दांडेली, हल्याळ शिरशी भागांत जांबोटीपेक्षाही अधिकच जंगल असताना तेथील रस्ते चकाचक आहेत…  वनखातेही पूर्वीच्या रस्त्यांना कोणतीच अडती आणत नाहीं! तर मग जांबोटी भागासाठी वेगळा कायदा का? यावर विचार होणे आवश्यक आहे. आणखी एक म्हणजे येथील नेत्यांची मानसिकता कारणीभूत आहे, मतदानापूर्तेच हे नेते जागे होतात, नागरीकांच्या समस्या कोण सोडवणार? नागरिकांनीच कायदा हातीत घ्यायची वेळ येणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

…..त्यातच आ. विठ्ठल हलगेकर यांनी जांबोटी भागात रस्त्यांसाठी विकासात्मक पाऊल टाकले आहे, येथील नागरीकांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे असं म्हणता येईल पण, केंव्हा आज उद्घाघाटन होणाऱ्या रस्त्यांच्या कामांची पूर्तता झाल्यानंतरच! याकडे आ. हलगेकर यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे एवढीच अपेक्षा!

  

तालुक्यांतील काहीं गावच्या रस्त्यांसाठी 7 कोटींचा निधी उपलब्ध;; आज या गावच्या रस्त्यांचा भाग्याचा दिवस…

   जांबोटी भागातील बैलुर फाटा ते बैलुर गाव या 5 किमी रस्त्यासाठी 4 कोटी मंजूर झाले असून, या कामाचा आज शुभारंभ होईल, पण, बैलुर आणि देवाचीहट्टी या चार कीमी रस्त्यापैकी जंगलातील एक किमीपेक्षाही कमी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, त्यामुळे या रस्त्याचे काम या टप्प्यामध्ये झाले तर खूपच चांगले होईल. बोगुर  एक किमी रस्त्यासाठी दिड कोटी, तोपिनकट्टी गावातील रस्त्यांसाठी 70 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच शिवोली चापगाव ते वड्डबैल तीन किमी रस्त्यासाठी 1 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर झाला आहे, यामध्ये लालवाडी – कोडचवाड रस्त्यांचाही समावेश असून, याआधी आवरोळी ते चिकदीनकोप्प रस्त्याचा विकास झाला आहे.. तत्काळ या कामांना सुरुवात होईल अशी माहिती बांधकाम खात्याचे तालुका सहाय्यक अभियंते संजय गस्ती यांनी लोकहित न्यूज ‘शी बोलताना दिली.

जंगल भागांतील रस्त्यांसाठी विशेष लक्ष आवश्यक..

सोसियल मीडियावर दोन दिवसापूर्वी चीगुळे आणि पारवाड रस्त्यांची चर्चा सुरू होती. यामध्ये चीगुळे रस्त्याची मागच्या वेळी पूजा करण्यात आली होती पण, वनखात्याच्या रूपाने मध्येच माशी शिंकली आणि हे काम थांबलेलेच आहे. पूर्वीपासून हा रस्ता असून त्यावर दोन तीनवेळा डांबर पडले आहे. असे असताना आताच का वनखाते अडवणूक करते? याची आमदारांनी चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच पारवाड रस्त्याचीही समस्या मार्गी लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे…

 

प्रतिक्रिया –

तालुक्यांतील जनतेने मला भरभरुन आशीर्वाद दिला आहे, त्यांच्याकडून रस्त्यांसह अनेक समस्या माझ्याकडे मांडल्या होत्या. त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही पुन्हा एकदा तालुक्याचा जनतेला मी विनंती करतो की, मला वेळ द्या सर्व समस्या सोडवण्यास मी कटिबध्द असेन!

  • आ. विठ्ठल सो. हकगेकर…

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *