,

मा. आ. काँग्रेस एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचा तेलंगणाच्या  ‘भारत समिट’ मध्ये सहभाग…खानापूरसाठी गौरवाची बाब ….


तेलंगणा:लोकहित न्यूज.                   

खानापूरच्या मा. आ. काँग्रेसच्या एआयसीसी सचिव डॉ . अंजली निंबाळकर यांनी आज (दि. 24 व शुक्रवार) यांनी तेलंगना सरकारच्या “भारत समिटच्या “जेंडर जस्टिस”या विषयावर बोलण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. तेलंगणातील हैद्राबाद येथे तेलंगाना सरकारच्या वतीने “भारत समिट” चे आयोजन केले असून जगभरातील ९५ देशातील ३०० प्रतिनिधी उपस्थित रहाणार असून यामधे ५ महिला भाषण देणार आहेत त्यामधे खानापूरच्या मा. आ. डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांना हा बहुमान मिळाला असून,या कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हेही उपस्थित रहाणार आहेत. देशातून ५ महिलांना जेंडर जस्टीस वर बोलण्याची संधी असून या महिलांमधे झारखंड च्या मंत्री दिपीका पांडे महाराष्ट्रातून खासदार प्रणित शिंदे व माजी मंत्री यखोमती ठाकूर तसेच महिला खासदार जोतिमनी यांच्यासह देशातून 5 महिलांचा सहभाग होता. यावेळी खानापूरच्या मा.आ. डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी जेंडर जस्टिस या विषयावर भाष्य केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *