सौगात ए – मोदी योजना; बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिमांना आपलेसे करण्याचा भाजपचा प्रयत्न..
दिल्ली: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी)
येत्या वर्षभरात बिहार पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर तसेच राज्य वक्फ बोर्डाची फेररचना अशी विविध राजकीय गणिते खेळण्यास भाजपने सुरवात केली असून, सौगात ए – मोदी या मोहिमेअंतर्गत देशातील 32 लाख ओबीसी गरीब मुस्लिमांना भाजपचे 32 लाख कार्यकर्ते थेट मशिदीपर्यंत भेटवस्तू पोच करतील असेही जाहीर करण्यात आले आहे. या मोहिमेची सुरुवात दिल्लीत झाली असून , भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली ही सौगात देण्यात आली. त्याप्रमाणे देशांतील 32 लाख मशिदीपर्यंत सौगात ए – मोदी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
मुस्लिम ओबीसीमधील पसमांदा समाजाला आपलेसे करण्याचा पंतप्रधान मोदींचा मानस…
मुस्लिम ओबीसीमधील पसमांदा या मागास वर्गाला पुढे आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. येत्या वर्षभरात बिहार पश्चिम बंगाल तसेच उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिमांना आपलेसे करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.. या भेटवस्तू मुस्लिमांचा मोठं सन मानल्या जाणाऱ्या ईददिवशी वाटण्यात येणार आहेत. दिल्ली येथील निजामुद्दीन भागांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली सौगात देण्यात आली आहे.
सौगात ए- मोदी काय आहे ही मोहीम?
-देशभरात 32 लाख गरीब मुस्लिमांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भेट वस्तू देण्यात येणार आहेत.. -देशांतील 32 लाख भाजप कार्यकर्ते 32 लाख मशिदीपर्यंत भेटवस्तू पोच करतील..
-भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता 100 मुस्लिमांना भेटवस्तू देणार आहे. -प्रत्येक पिशवीत कपडे, शेवया, सुकामेवा, खजूर अशी ही भेट वस्तू असेल..
मतांचे राजकारण ?
पुढील सहा महीन्यात ऑक्टोंबर – नोव्हेंबरमध्ये 17 टक्के मुस्लिम संख्या असणाऱ्या बिहारमध्ये निवडणुक, पुढील वर्षी मार्चमध्ये 27 टक्के मुस्लिम संख्या असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होणार आहे. या दोन्हीं राज्यांमध्ये मुस्लिमांचा प्रभाव असल्याने मुस्लिमांपर्यंत पोहचण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.. जरी भाजपकडून मुस्लिम उमेदवार देण्यात येत नसला तरी मुस्लिमांपर्यंत काहीं करुन पोहचायची ही जणू मोहीमच राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.. कर्नाटकात नुकतेच येथील काँग्रेस सरकारने मुस्लिमांना जाहीर केलेल्या 4 टक्के आरक्षणाविरोधात कर्नाटकातील विरोधी पक्ष भाजपकडून आक्रोश व्यक्त करतांना दिसत आहे. तर दुसरीकडे खुद्द भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौगात ए – मोदी ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार देशांतील भाजप कार्यकर्त्यांना 32 मशिदीपर्यंत पोहचायचे आहे… त्यामुळे हे मटांचे राजकारण कशे पेलणार? असा प्रश्न आहे…


H
Leave a Reply