देवाचीहट्टीत पांडुरंग सप्ताह निमित्त मानवी जीवनाचे उगडले रहस्य..
देवाचीहट्टी: लोकहित न्यूज
आपण कशाला जन्माला आलो आहोत, जीवनाचा उपयोग काय आहे, याचा विचार होणे गरजेचे होते. मानवी जीवन सार्थकी लागण्यासाठी चांगलेच परोपकारी कार्य करा असे मत गोव्याचा तरूण किर्तनकार कु. चिन्मयी कामत यांनी आपल्या कीर्तनातून मांडले. भगवंत आणि निसर्गाने आपणा सर्वांना कशासाठी जन्म दिला आहे याचे पहिल्यांदा प्रत्येकाने चिंतन करण्याची वेळ आली आहे. आपला देश साधू संतांचा देश आहे, संतांनी वृक्षाप्रमाने स्वतः जळून दुसऱ्यांना सावली दिली आहे. तसे संतासारखे वटवृक्ष व्हा! तरच आणि तर जीवन सार्थकी लागले असे म्हणावे लागेल असेही त्या म्हणाल्या… देवाचीहट्टी (ता. खानापूर) येथील 30 व्या पांडूरंग सोहळ्यानिमित्त त्या बोलत होत्या.
मीपणा सोडा, समाज- देश धर्म बाळगा अन् जीवनाचे रहस्य जाणा..
मी म्हणजे सर्वस्व, मी केले, मी होतो म्हणून हे सर्व आहे . हे सर्व सोडून परोपकारी वृत्ती बाळगत मी ऐवजी आम्हीं अशी भावना बळगा. समाज संघटित करून सर्वांना बरोबर घेवून चला. तरच जीवन धन्य झाले असे म्हणावे लागेल. पहिल्यांदा समाज एकत्र करून देश आणि धर्म बाळगा असे आवाहन किर्तनकार कामत करतांना स्वच्छ पाण्यासारखे जीवन जीवन जगा असेही त्यांनी स्पष्ट केले. जीवन हे एकट्यानेच जगायचे आहे, येथे कोणी कीतीही प्रिय आणि जवळचा असला तरी शेवटी कोणीही बरोबर येत नसते, सर्व दुनिया मायावी आहे. संसाबरोबर भागवतांच्या भक्तीत लीन व्हा असेही कामत यांनी दोन तासाच्या कीर्तनात करतांना संपूर्ण जीवनाचे रहस्यच उलगडले.
चौकट –
सुंदर किर्तन, तालबद्ध हार्मोनियम, तबल्याची साथ… समाज प्रबोधन..
चिन्मयी कामत यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कीर्तन सादर करतांना गावकरी भक्तांना भगवतांच्या भक्तीत न्हावून नेले. त्यांना तितकीच हार्मोनियम व तबलासाथ लाभली. या कीर्तनातून समाज प्रबोधनही झाले आहे. आजच्या धावत्या जगतात सांसारिक लोभापायी सर्वांना ईश्वरभक्तीचा विसर पडू लागला आहे. तो स्वभावगुण बदलून संसाबरोबर भगवंताचे स्मरण असावे असेही त्यांनी शेवटी नमूद केले..
Leave a Reply