जर्शी नं.45-18 निवृत्तीनंतर भारताची कसोटी …


चार दिवसांपूर्वी रोहित तर सोमवारी कोहलीचा कसोटी क्रिकेटला अलविदा..

नवी दिल्ली: लोकहित न्यूज

   भारतीय क्रिकेट जगतात एक काळ असा होता की, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही. व्हीं.एस.लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतरचे भातीय क्रिकेट कसे ?असेल असा प्रश्न संपूर्ण भारतीयांना पडला होता. त्याला उत्तर मिळण्यासाठी वरील खेळाडूंचे वारसदार म्हणून रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांच्या रूपाने दोन लखलखते तारे भारतीय क्रिकेटला मिळाले. तब्बल वर्षाच्या कालावधीत या जोडगोळीने खूप काहीं मिळवून दिले. तो मग कसोटी प्रकार असो की एकदिवसीय वा टी -20 . या तिन्हीं डावात रो-को’नी अनेक पराक्रम करुन दाखवले. त्यात रन मशीन किंग कोहलीने शतकांचा डोंगर रचत सचिन तेंडुलकर यांच्या अनेक रेकॉर्डचा पाठलाग केला तर  हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितने एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक, एकदिवसीय मधील 264 धावांचे जागतिक रेकॉर्ड रचत सिक्सरांचा पाऊस पाडला . टी -20 नंतर आता कसोटी प्रकारातही एकाच वेळी दोघांनीही निवृत्ती घेतल्याने भारतीय कसोटी क्रिकेटची कसोटी असेल असे म्हणावे लागेल!

  … तरीही निवड समितीने के. एल. राहुल, जसप्रीत बुमरा आणि रविंद्र जडेजा या सद्याच्या अनुभवी खेळाडूंच्या जोरावर आणि युवकांच्या बळावर या पुढील कसोटीची तयारी केली असल्याची माहिती माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी वृतसस्थांशी बोलतांना दिली.

एक नजर दोघांच्या कारकीर्द वर….

   यशस्वी कॅप्टन म्हणून ओळख निर्माण केलेल्या रोहितने कसोटीच्या 45 डावात 46.13 च्या सरासरीने 3 ,137 धावा काढल्या, त्यात 8 शतक आणि 14 अर्धशतकांचा सामवेश असून, 212 ही या प्रकारातील सर्वोच्च धावसंख्या आहे. तर किंग कोहलीने 30 शतके ठोकली असून तब्बल 90 डावात 21 शतके साकारली आहेत, त्यात सात द्विशतकांचा समावेश आहे. कोहलीच्या कॅप्टनशिपमध्ये 67 डावात 40 विजय साकारत उत्कृष्ट कर्णधार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे…

आयपीएल अपडेट…

  भारत – पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढल्याने तब्बल दोन आठवडे ठप्प राहिलेल्या आयपीएल क्रिकेट मधील उर्वरित सामने 17 मेपासून खेळवले जाणार असून,3 जूनला अंतिम सामना होईल असे भारतीय नियामक मंडळाने जाहीर केले आहे. नवीन वेळापत्रक असे….17 मे ला आरसीबी वि. केकेआर, 18 मे दोन सामने असून आरआर वि. पीबीके, आणि गुजरात वि. दिल्ली, 19 मे ला लखनौ वि. हैद्राबाद, 20 मे रोजी चेन्नई वि. राजस्थान, 21 मेला मुंबई वि. दिल्ली यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. 27 मे पर्यंत असे सामने चालतील तर 29 मे पहिला क्वालिफायर, 30 मे एलिमेटर, 2 जूनला दुसरा क्वालिफायर तर 3 जूनला अंतिम सामना होणार आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *