ग्रामीण भागांत संस्कृतीचे जतन: खा. हेगडे


जांबोटी पश्चिम भागांतील चीखले, चापोलीसह लगतच्या गावांना आ.विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने भेट…

जांबोटी: लोकहित न्यूज..

    खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात खऱ्या अर्थाने संस्कृतीचे पूर्वीपासून जतन केले जाते, याचे सर्वांनी कौतुक केले पाहिजे. अशीच एकजूट कायम ठेवावी असेही आवाहन खासदार विश्वेश्वर कागेरी हेगडे यांनी जांबोटी भागाच्या भेटीदरम्यान केले. चालू महिन्यात  चिखले येथे भव्यदिव्य अशा सातेरी केळबाय मंदीर तर जांबोटी चापोली गावामध्ये श्री हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी खा. हेगडे यांना अमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ते त्यावेळीं काहीं कारणास्तव हजर राहू शकले नव्हते. त्यामुळें नुकतेच ते तिरंगा ध्वज यात्रेनिमित्त खानापुरात आले असता, सदर दोन्हीं मंदिरांच्या कार्यक्रमांची आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्यांना आठवण करून दिल्यानंतर खा. हेगडे यांनी या वरील दोन्हीं गावांना भेट देत भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील चालीरीती आणि गावकऱ्यांचा एकोपा पाहून भारावून गेले. या भागासह तालुक्यात प्रत्येक समस्येचे तत्काळ निर्मूलन केले जाईल असेही त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार विठ्ठल हकगेकर, मा. आ. अरविंद पाटील, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानीकोप, लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील, युवा नेते दौलत कोलीकर , युवा नेते पंडित ओगले, गुंडू तोपिनकट्टी , ॲड.चेतन मणेरीकर, कृष्णा गावडे, अपान्ना गावडे, संजय पाटील, सहदेव पाटील यांच्यासह दोन्हीं गावचे पंच नागरीक व युवावर्ग उपस्थित होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *