,

जांबोटी रस्त्यावर अपघात; वडगांवजवळ मिनीबस पलटी होवून तिघे जखमी..


खानापूर – जांबोटी मार्ग बनला मृत्यूचा सापळा; अरुंद रस्त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच…

जांबोटी: लोकहित न्यूज…

      आधीच अरुंद रस्त्ता, खड्ड्यांमुळे बेहाल झालेल्या नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी होत असताना अरुंद खानापूर – जांबोटी रस्त्यामुळे बाजू देताना विध्यार्थांची मिनीबस पलटी होऊन तिघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. कुसमळी पुलावरून वाहतूक बंद असल्यामुळे गोवा आणि बेळगांवकडील वाहतूक  बैलुर आणि खानापूर -जांबोटी रस्त्याने सुरू आहे. मात्र, हे दोन्हीं रस्ते अरुंद आणि आधीच खड्डेमय असताना त्यात आता चोर्ला मार्गावरील वाहतुकीचा भार या रस्त्यांवर पडल्यानेअधिकच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच बेळगावहून गोव्याकडे निघालेल्या विद्यार्थांच्या मिनीबस ला अपघात झाला आहे. वडगांवजवळील वळणावर ही बस आली असता, समोरून दुसरे वाहन आल्याने बाजू देताना ही बस एका बाजूला कलंडत पलटी झाली. त्यातील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी त्यातील तिघे प्रवाशी जखमी असल्याने त्यांना लगतच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

अरुंद रस्ता, खड्ड्यांमुळे अपघातात वाढ…

     खानापूर जांबोटी रस्ता हा आधीच अरुंद त्यात वाढत्या वाहतुकीमुळे अधिकच भार पडला असून, अपघातात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. बांधकाम खात्याचे तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज नाही. आ. विठ्ठल हलगेकर यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *