पोस्टातून थेट सबधिंताच्या दारात पत्रासह, विविध कागदपत्रे पोहचणार..
नवी दिल्ली: लोकहित न्यूज..
मोबाईल, फोन विकसित झाल्यापासून पोस्ट खात्याला फटका बसणार की, काय असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, काळाबरोबर पोस्ट खात्यानेही बदल करत डिजिटलकडे कल दिला. अलीकडच्या काळात पोस्ट खात्याने आणलेल्या विविध योजना प्रभावी ठरतांना दिसत आहेत. ऑनलाईवर पोस्ट खात्याने विषेश भर दिली असून, आता आणखी एक ऑनलाईन प्रणाली या खात्याकडून विकसित करण्यात येणार आहे. यापुढे पिनकोडऐवजी डिजीपिन ही नविन प्रणाली येणार असून, त्याद्वारे थेट संबंधितांच्या दारात पत्रासह विविध कागदपत्रे पोहचणार आहेत. यापूर्वी असलेल्या पिनकोडवरून अमुक तो भाग म्हणून (गणले) ओळखले जायचे. आता डिजी पिनमुळे पत्र वा विविध महत्वाची कागदपत्रे थेट संबंधितांपर्यंत पोहचणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन पिन देण्यात येणार असून, त्याद्वारे डीजीपिनवर पोस्टाचे काम अधिक सुलभ होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. पोस्ट खात्याच्या या नविन प्रणालीमुळे नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. लवकरच ही नविन प्रणाली कार्यान्वित होईल.
Leave a Reply