….कुसमळी पुलाच्या धिम्या गतीच्या कामामुळे स्थानिकसह गोवा प्रवाशांना फटका..


तोराळी पुलाचे दरवाजे उघडल्याने नविन पुलाच्या बाजूचे पर्यायी पुल खचला , रविवारी पुंन्हा चोर्ला मार्ग पडला बंद..

जांबोटी: लोकहित न्यूज

     बेळगांव आणि जांबोटी चोर्ला पणजीला जोडणारा दुवा म्हणून मलप्रभा नदीवरील कुसमळी पुलाची ओळख आहे. मात्र, हे पुल गेल्या महिन्यापासून चांगलेच चर्चेत आले आहे. परिणामी येथील नव्या पुलाचे बांधकाम धीम्या गतीने सुरू असल्याने भिविष्यात येथून मार्ग सूरू राहणार की, बंद पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी याच नदीवरील तोराळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडल्याने नदीच्या पाण्याचा विसर्ग वाढला अन् त्याचा परिणाम कुसमळी पुलाच्या बाजुला पर्यायी वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या छोट्या पुलावर जाणवला. नदीचे पाणी वाढल्याने सदर पर्यायी पुल खचल्याने महीन्यात दुसऱ्यांदा येथून गोवा आणि बेळगांवकडील वाहतूक  बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळें बैलूर व्हाया देवाचीहट्टी जांबोटी व बेळगांव खानापूर व्हाया जांबोटी अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळें पुलाचे काम धीम्या गती सूरू असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. या कामाची गती न वाढवल्यास पावसात येथून मार्ग बंद पडण्याची भीती आहे.

     

…..पुलाचे बांधकाम बऱ्यापैकी पण…. थोडक्यात अडकले…

    कुसमळी पुलाचे बांधकाम बऱ्यापैकी झाले असून, दोन्हीं बाजूच्या कडेचे काम अपूर्ण शिवाय बांधकाम ताजे असल्याने नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यास विलंब होत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्या पुलाच्या मधल्या दरवाजातून नदीच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळें बाजूचा दरवाजांना ताण पडत नाहीं. पण, परिणामी भिविष्यात पाऊस वाढला तर मात्र, येथून वाहतूक पूर्णतः बंद पडण्याची शक्यता आहे. परिणामी कामाची गती वाढवली तरी केलेले बांधकाम घट्ट होण्यास किमान महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळें या पुलाचे काम पावसावर अवलंबून असेल ,अशी सध्याची स्थिती आहे. पावसाने आणखी पंधरा दिवस किंवा महिनाभर उघडीप दिली तर येथील काम पूर्ण होवू शकते.

प्रतिक्रिया –

पुलाचे बांधकाम धीम्या गतीने सुरू असल्याने वाहतूक बंद ची समस्या वारंवार जाणवत आहे. सुरवातीलाच कंत्रादाराने उशिरा काम हाती घेतल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

  • जयराम देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जांबोटी..

काम बऱ्यापैकी झाले असून, थोडकेच बाकी आहे. कमाची गती जरी वाढविली तरी स्लॅबचें बांधकाम घट्ट होण्यास किमान वीस ते महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. तरीही उरलेल्या कामाची गती वाढवून लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करण्याची गरज आहे.

  • अनंत सावंत, सामाजिक कार्यकर्ते कुसमळी…

   

  ..तुझा कॉन्ट्रॅक्टर की ,माझा कॉन्ट्रॅक्टर.. यात अडकले बैलुर रस्त्याचे टेंडर.. आमदार लक्ष देतील का? …

परिणामी जांबोटी – चोर्ला मार्गावरील वाहतुकीचा भार बैलूर आणि खानापूर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळें बांधकाम खात्याचे तत्काळ याची दखल घेऊन दोन्हीं रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बैलुर रस्त्याला मंजुरी मिळाली असली तरी तुझा कॉन्ट्रॅक्टर की, माझा कॉन्ट्रॅक्टर यामुळें टेंडरचें काम अडकून पडले आहे. त्यामुळें हे ग्रहण कधी? सुटणार असा प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. याकडे आमदार विठ्ठल हलगेकर लक्ष देतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *