खानापूर, रामनगर, जांबोटी भागात अवकाळीचा दणका


जांबोटी: लोकहित न्यूज

     गेल्या महिन्यापासून उन्हाचे चटके जोरात बसत होते, गरमीने उच्चांक गाठला होता. तर गेल्या आठवड्यापासून आकाशात ढग दाटत असल्याने पावसाचे वातावरण तयार होवून पुन्हा आकाश मोकळे असे चित्रं दिसत होते. अखेर मंगळवारी दुपारी काहीं ठिकाणीं पावसाचे शिंतोडे पडून गेले. तर सायंकाळी पाचच्या सुमारास खानापूर, रामनगर, जांबोटी परीसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल पवनातास पावसाने झोडपून काढले. रामनगर – खानापुरच्या दिशेने पावसाने कुच केली. लागलीच बघता बघता जांबोटी भागांत पावसाने हजेरी लावली. वादळामुळे जांबोटी -खानापूर रस्त्यावर काहीं ठिकाणीं झाडांच्या फांद्या मोडून पडल्या तर जांबोटी -हब्बनट्टी परीसरातही काहीं ठिकाणीं झाडांच्या फांद्या मोडून पडल्याच्या घटना घडल्या. या पावसाने काजू पिकाला दिलासा मिळाला आहे. अलीकडच्या महिनाभरात धुके पडल्याने काजू पिकाला फटका बसला होता. आजच्या पावसाने पुन्हा काजु पीक बहरण्यास वाव मिळणार आहे. तर दुसरीकडे पावसामुळे गरमी काहीशी कमी झाली असून, तूर्तास तरी गारवा निर्माण झाल्याचे चित्रं दिसत आहे.. पावसामध्ये खानापूर आणि परीसरात विट व्यवसायिकांनी एकच उडाली धांदल उडाली .

चौकट –

शंकरपेठ परीसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने येथील मलप्रभा नदीवरील पुलावर डोगलभर पाणी साचले होते. ..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *