
मंततूर्गा येथे नागेश महारुद्र मंदिराचे उद्धघाटन; आमदारांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती…
खानापूर: लोकहित न्यूज
आजच्या जीवनात शिक्षणाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले असले तरी त्याचबरोबर व्यक्तीचा मूळ पाया असलेल्या हिंदू संस्कृती, परंपरा, चालीरीती जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे उच्च शिक्षणापासून शहरी भगातील तरूण मंडळी सुधारत असली तरी त्यांच्याकडून आपल्या संस्कृतीचा विसर पडू लागला आहे की,काय? अशी शंका येवू लागली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र, खऱ्या अर्थाने संस्कृतीचे रक्षण आणि जतन केले जात आहे असे म्हणण्यास हरकत नाही असे स्पष्ट मत भाजप नेत्या, सुप्रसिद्ध डॉ. सोनाली सरनोबत यांनी मांडले. मणतूर्गा ( ता.खानापूर) येथे श्री नागेश महारुद्र मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळीं डॉ. सरनोबत या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. सिध्देश्वर मठाचे माठाधिश प.पू श्री. सिद्राम महाराज हंडोळी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. व्यासपीठावर आ. विठ्ठल हलगेकर, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, मा. जि. सदस्य विशाल पाटील, माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल,भाजप युवा नेते पंडित ओगले, सागर अशोक पाटील, जांबोटी सोसायटीचे संस्थापक -चेअरमन विलास बेळगांवकर, तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी यांच्यासह अनेक आजी -माजी मान्यवर उपस्थित होते. माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी पुढे बोलतांना, डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, गावकऱ्यांचा एकोप्याने सुंदर अशा मंदिराची निर्मिती झाली असून, हीच या गावची निशाणी म्हणून अनेक वर्षे ओळखली जाईल. शहरी असो वा ग्रामीण भागांतील विशेषकरुन तरुणींनी हिंदू संस्कृती,परंपरा,चालीरीती जपून ठेवण्याची गरज आहे. आपण कितीही शिक्षण घेऊन पुढे जात असलो तरी त्याचबरोबर संस्कृतीचा विसर पडता कामा नये, शिक्षणाबरोबर संस्कृतीही तितकीच महत्वाची असल्याचेही त्या म्हणाल्या.
चौकट –
….माजी आमदार अशोक पाटील पाटील यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम…
येथील नागेश महारुद्र मंदिराचा उद्धघाटन कार्यक्रम माजी आमदार कै.अशोक नारायण पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे मुलगे माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल पाटील व सागर अशोक पाटील यांच्या विशेष उपस्थितीत पार पाडण्यात आला.

Leave a Reply