कुसमळीत शाळेपासून ते बाबुराव देसाई यांच्या घरापर्यंतच्या पाच लाखाच्या सीसी रस्त्याचे उद्घघाटन…
जांबोटी: लोकहित न्यूज..
अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेताच अरोही अनंत सावंत यांनी बैलुर पंचायत क्षेत्रातील समस्या सोडविण्यावर आधिकच भर दिला आहे. स्वतःच्या गावात विकास कामांचा धूमधडाका लावला असून, कुसमळी गावातील शाळा ते बाबुराव देसाई घरापर्यंत सीसी रस्ता बांधण्यासाठी 5 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. नुकतेच त्याचे अध्यक्षा आरोही अनंत सावंत यांच्याहस्ते उद्धघाटन करण्यात आले. यावेळी यावेळी ग्रामविकास समिती अध्यक्ष तीळाजी पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य गणपती सावंत, सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत, प्रल्हाद कोडचवाडकर, पवण गायकवाड, प्रवीण पाटील, आप्पाजी सावंत, बाबुराव पाटील, बाबुराव सावंत भैरू कल्लेहोळकर यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होती. या कामामुळे गावात समाधान व्यक्त केले जात आहे..

Leave a Reply