
खानापूर :लोकहित न्यूज
प्रथमोपचाराने कोणत्याही रुग्णांचे प्राण वाचवले जावू शकतात हे नुकत्याच खानापूरात घडलेल्या घटनेने सिद्ध झाले आहे. अशी घडली खानापूर येथे सदर घटना….नेहमीप्रमाणे गजबजलेले ठिकाण, मध्यानाच्या उन्हाचे चटके तीव्र झालेले, वयाच्य 80 च्या उंबरठ्यावर पोहोचलेले एक वृद्ध गृहस्थ धीम्या पावलाने चालता चालता अचानकपणे जमिनीवर कोसळतात, डोळे पांढरे झालेले, अंगावर दरदरून घाम फुटलेला, क्षणार्धात भोवताली बघायची गर्दी जमलेली, अशावेळी एक युवक पुढे होतो आणि त्या वृद्धास कृत्रिम स्वासोच्छवास प्रथमोपचार करतो आणि आश्चर्य म्हणजे काही वेळात तो वृद्ध उठून बसतो. ही स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात घडली खानापूर येथील जांबोटी क्रॉस वर त्या मरणासन्न प्रसंगात बुद्धाचे प्राण वाचविणाऱ्या युवकाचे नाव आहे महेश नेमानी कदम. पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता हृदय थांबणे(कार्डियाक अरेस्ट) हा वैद्यकीय शास्त्रातला एक प्रकार असून अशावेळी एखाद्याचा प्राण सुद्धा जाऊ शकतो हे तपासणीतून सिद्ध झाले. तात्पर्य काळा आला पण वेळ आली नव्हती म्हणतात असेच हे घडले. आणि यावेळी कृत्रिम स्वासोच्छवास या प्रथमोपचाराचे महत्त्व सुद्धा अधोरेखित झाले. संकटप्रसंगी ही प्रथमोपचार पद्धती खूप महत्त्वाची आहे याचे तंत्र लोकापर्यंत पोहोचले तर अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचावीता येतात असे मत महेश कदम यांनी व्यक्त केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वसामान्यांना सुद्धा कृत्रिम प्रथमोपचार व श्वासोच्छवास हा प्रथमोपचार करता येणे गरजेचे आहे म्हणून राज्य ऑर्थोपेडिक डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष व लोटस हॉस्पिटल बेळगावचे चेअरमन डॉ.अनिल पाटील रोटरी इ क्लब(3160) बेळगाव व कदम क्लिनिक खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर येथील ओमकार हॉटेल च्या वरच्या मजल्यावर गुरुवार तारीख 20 मार्च 2025 रोजी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नागरिकांनी सहभागी होऊन प्रथमोपचार पद्धतीची माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे

Leave a Reply